शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांचा दुष्काळप्रश्नी शब्दच्छल : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 20:08 IST

सरकारने दुष्काळसदृश स्थिती जाहीर केली म्हणून विरोधकांनी राजकारण करण्याचे कारण नाही. किमान आम्ही ‘दुष्काळ’ हा शब्द तरी वापरला, मागील सरकारने दुष्काळ टाळण्यासाठी ‘टंचाई’ हा शब्द शोधून काढला होता.

ठळक मुद्देमागील सरकारने दुष्काळाऐवजी टंचाई शोधून काढली!आम्ही लाभार्थींच्या यादीची तपासणी करणार आहोतजनावरांसाठी चारा आणि दुष्काळग्रस्तांसाठी पाण्याची व्यवस्था करताना सरकार कोठेही कमी पडणार नाही

सांगली : सरकारने दुष्काळसदृश स्थिती जाहीर केली म्हणून विरोधकांनी राजकारण करण्याचे कारण नाही. किमान आम्ही ‘दुष्काळ’ हा शब्द तरी वापरला, मागील सरकारने दुष्काळ टाळण्यासाठी ‘टंचाई’ हा शब्द शोधून काढला होता. त्यामुळे शरद पवारांनी अशाप्रकारचा शब्दच्छल करण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगलीत लगावला.

येथे  जिल्हयातील सर्व शासकीय विभागांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधाला.ते म्हणाले की, केंद्र शासनाने दुष्काळासंदर्भात पाहणी करण्यासाठी शाष्ट्रीय पद्धत तयार केली आहे. त्यामध्ये ट्रिगर पद्धतीने पाहणी करण्यात येते. महाराष्टतही आता दोन ट्रिगर पूर्ण केल्यानंतर १८० तालुके दुष्काळसदृश जाहीर केले आहेत. केवळ घोषणा नव्हे, तर प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केली आहे. अशा तालुक्यांमध्ये वीजबिल, शिक्षण शुल्क सवलत, जमीन महसूल वसुली थांबविणे अशा सर्वप्रकारच्या सवलतीही लागू केल्या आहेत.

पाणी व चारा उपलब्ध करून देण्याचे नियोजनही केले जात आहे. दुष्काळ जाहीर करण्याचा टप्पा पुढचा आहे. तरीही इतक्यात ‘दुष्काळसदृश’ या शब्दावरून राजकारण सुरू झाले आहे. आम्ही किमान ‘दुष्काळ’ या शब्दाचा वापर तरी केला. मागील सरकारने दुष्काळ हा शब्दच वगळून ‘टंचाई’ व ‘टंचाईसदृश’ अशाप्रकारचा शब्द वापरला होता. त्यामुळे कॉँग्रेस व राष्टवादीच्या नेत्यांनी लोकांची दिशाभूल करणे बंद करावे. राजकारणासाठी राजकारण करून त्यांना काहीही मिळणार नाही.

राज्यातील भूजल पातळीत घट झाली म्हणूनही विरोधकांनी जलयुक्त शिवार योजनेची खिल्ली उडविली. वास्तविक पहाटे उठून गेली वर्षभर आपल्या गावासाठी राबणाऱ्या, श्रमदान करणाºया तमाम लोकांचा अपमान ते करीत आहेत. त्यांनी केलेल्या कष्टाबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. राज्य शासनाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. काही सामाजिक संस्थांनीही याकामी हातभार लावून संपूर्ण देशात सर्वात मोठे काम महाराष्टÑात केले. जलयुक्त शिवार योजनेमुळे भूजल पातळी वाढलेलीच होती. गेल्या तीन वर्षाची आकडेवारी पाहिली तर, ते सिद्धही करता येते. यंदा दुष्काळसदृश परिस्थिती, पाण्याची मागणी व त्यातून झालेला भूजलाचा उपसा यामुळे ही पातळी घटल्याचे दिसत आहे. याचा अर्थ जलयुक्त शिवार योजना कुचकामी ठरली, असा होत नाही. त्यामुळे कॉँग्रेस, राष्टवादीच्या नेत्यांनी परिस्थितीचा अभ्यास करूनच बोलावे, असे ते म्हणाले.गोंधळ होणार नाही!दुष्काळाचे मोजमाप करताना गोंधळ होणार नाही. सांगली जिल्चेच उदाहरण घेतल्यास आटपाडीसारख्या भागात सरासरीच्या ३५ टक्के पाऊस, तर दुसरीकडे शिराळा तालुक्यात १३० टक्के पाऊस अशी स्थिती आहे. अशावेळी सरासरीत गफलत होऊ शकते, मात्र सरकारने शास्त्रीयदृष्ट्या पाहणी करताना कोणत्याही भागावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. जनावरांसाठी चारा आणि दुष्काळग्रस्तांसाठी पाण्याची व्यवस्था करताना सरकार कोठेही कमी पडणार नाही, असे फडणवीस म्हणाले. 

लाभार्थींची तपासणी करणारमुद्रा योजनेतील गैरप्रकारांबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, मुद्रा योजनेचा लाभ कोणाला झाला, त्याची यादी आम्ही मागविली आहे. एकाच व्यक्तीला वाढीव कर्ज देताना मुद्रा योजनेचा वापर केला असेल तर, अशा यादीतून त्या गोष्टी कळू शकतात. त्यामुळे आम्ही लाभार्थींच्या यादीची तपासणी करणार आहोत. तरीही असे प्रकार कोठे घडल्याची तक्रार नाही. 

म्हैसाळ भ्रूणहत्या प्रकरणाबाबत चौकशी करू!फडणवीस म्हणाले की, राज्यातील गुन्च्या प्रकरणात शिक्षेचे प्रमाण वाढले आहे. त्याबाबत सक्त सूचना पोलीस दलाला दिल्या होत्या. काही जुन्या प्रकरणांमध्ये तांत्रिक अडचणींमुळे लवकर आरोपपत्र दाखल न होणे, तपासात अडथळे येणे व त्यामुळे न्यायालयीन प्रकरणांना उशीर होणे, असे प्रकार घडले आहेत. अशा जुन्या प्रकरणांचा तपास करून न्यायालयीन बाबींचा जलदगतीने निपटारा करण्याचे आदेश दिले आहे. म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाबद्दल चौकशी करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSangliसांगलीSharad Pawarशरद पवार